पुणे : महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना एसटी आंदोलन राज्यात खुप गाजलं होतं. त्या आंदोलनात भाजपनेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली होती. अशातच आता एसटी महामंडळाने मागील 2 महिन्यांपासून 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केला नाही. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
“राम मंदिराआधी अयोध्यात योगीच मंदिर; काॅंग्रेसचा खोचक टोला, म्हणाले, पहिले 33 कोटी होते, आता..;”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात येण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने पगाराचे पुर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानुसार मागील 2 महिन्यापासून 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केला नाही. यावरून कुठे आहे रे कडकनाथा असा सवाल रूपाली पाटलांनी केला आहे.
“किरीट काका भाजप व शिंदे सरकारने तरी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं”, मिटकरींना डिवचलं
एसटी महामंडळाचे प्रती महिना 450 कोटी रूपये उत्पन्न तर खर्च प्रती महिना 650 कोटी रूपये आहे. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रती महिना पगारासाठी 310 कोटी, डिझेल 250 कोटी तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रूपये खर्च होतो. एसटी महामंडळाला सरकारकडून 360 कोटी ऐवजी आता केवळ 100 कोटी रूपये निधी मिळत असल्याने उर्वरित 200 कोटी रूपये आणायचे कुठून असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
मतदारसंघात एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही : चंद्रकांत पाटील
दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना ऐनदिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर राज्यात अनेक गोष्टी घडल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून सरकारने काही निधी महामंडळांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऐनदिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांवर अशी वेळ आली आहे.
Read also
- “बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर मला संपवण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी हाती घेतला”; रामदास कदम
- ‘अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है,
- “सोमय्यांच्या आरोपांची तार आज छेडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली”
- “रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करा”; भास्कर जाधवांनी कदमांना फटकारलं
- “संजय राऊतांना सुटका नाहीच”; राऊतांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला