येत्या 5 ऑगस्टला रामंदीर भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून त्या वेळच्या बाळासाहेब टाकरेंच्या घोषणेची शिवसेनेने सामनातून आठवण करून दिली आहे. त्यावेळी शिवसेनेने बाबरीचे घुमट तोडले नसते तर,राममंदिर भूमिपूजनाचा दिवस कधीच उजाडला नसता असे शिवसेनेने सामातून म्हटले आहे.
ज्या दिवशी दुपारी बाबरी कोसळली हे स्पष्ट झाले, त्या दिवशी अनेक योद्ध्यांचे चेहरे भीतीने काळे पडल्याचे जगाने पाहिले. “हे तर आमचे कामच नव्हे. बाबरी पाडण्याचा उद्योग शिवसेनेने केला’’ असे सांगून भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी मोकळे झाले. त्यावेळी मुंबईत वीज कडाडावी तशी शिवसेनाप्रमुखांची वाणी गरजली. “होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.’’ या एका घोषणेने समस्त हिंदूंची मने व मनगटे उसळून निघाली.
लोकांनी शिवसेनाप्रमुखांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून डोक्यावर घेतले. वाघाची डरकाळी म्हणजे काय ते त्याच दिवशी महाराष्ट्राने दाखवले. हा इतिहास कोणालाच नाकारता येणार नाही. असे शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सांगितले आहे. तसेच बाबारीचे घुमट तोडल्यानंतर भाजपाने ते आम्ही नव्हे म्हणून जी भूमिका घेतली होती त्याचाही उल्लेख आजच्या सामनात केला आहे.