यवतमाळ : गेल्या काही वर्षापासून महाविकास आघाडीतील अनेक राजकीय नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. यामध्ये यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा नाव देखील सामील आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब चिंतामणी मंदिरात शिवसेनेकडून आज इडा पिडा टळो यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून यज्ञ केला जात आहे.
अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
भावना गवळी यांना महिला उत्कर्ष ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी इडीकडून तीनवेळा समन्स बजावण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्यांनी भावना गवळी यांच्यावर करोडो रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर इडीने सप्टेंबर महिन्यात भावना गवळी यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. याप्रकरणी सईद खान या व्यक्तीला इडीने ताब्यात घेतले होते. सईद खान हा त्या कंपनीचा संचालक असून त्यांच्या मध्यस्थीने एकूण 18 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार असल्याचं उघड झाले होते.
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आवाज उठवला होता. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठुन, असा प्रश्न उपस्थित करत सोमय्यांनी त्यांची चौकशी कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर सईद खान आणि भावना गवळी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कंपनी निंबंधकांकडे बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि या कंपनीच्या माध्यमातून पैशांचा अपहार करण्यात आला असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
दरम्यान, त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून भावना गळवी यांच्यामागे इडीचा ससेमिरा हा जाणीवपुर्वक आणि राजकारण करून लावला जात आहे. त्यातून त्यांची निर्दोष सुटका व्हावी त्यासाठी आम्ही सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून यज्ञ करत असल्याचं यवतमाळ शिवसेना शहराध्यक्ष पिंटू बांगर यांनी सांगितलं आहे.
Read also:
- “बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता बकरीसेना झाली”; नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात
- “कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, मग तो कुणीही असो”; राऊतांनी संभाजी राजेंना स्पष्ट सांगितले
- “पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”;
- संभाजीनगरचं नामंतर झालं, असं बोलणारा तु कोण? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- काॅंग्रेसला गळती, शिवसेनेला चिंता; नाना पटोले म्हणाले, ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांच्याबद्दल..;