मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, राज्यात मोठी खळबळ उडाली असून, राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या निकालाननानंतर एकीकडे मराठा समाज नाराज झाला असून, मराठा समाजातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत तर, विरोधकांनी देखील मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं होतं. मात्र हे कपाळकरंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. या सरकारने कोर्टात योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतलं नाही, वकिलांना मार्गदर्शन केलं नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे देखील जोडले नाहीत”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकावर केला आहे.
अशोक चव्हाणांवर टीका करताना त्यांनी, “अशोक चव्हाण तुम्ही फार हुशार आहात. तुमचा “आदर्श” घेण्यासारखा आहे. दोन वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का?, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार पुन्हा गेले. राज्य सरकार का पुन्हा कोर्टात गेले नाही?”, असा रोखठोक सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.
तसेच, “अशोक चव्हाण तुम्ही वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत आला आहात. अशोक चव्हाण यांना देण्यात आलेल्या जबाबदारीवरून बाजूला करा. मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्याला उपसमितीचा अध्यक्ष करू नये. या धनदांडग्या नेत्यांना या समितीवर नका ठेऊ,” अशी आक्रमक मागणी देखील सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Read Also :
- फडणवीसांना दुसरं काम काय, भाजपने आता माशा मारण्याची स्पर्धा भरवावी
- आता या मुद्द्यावर राज्यपालांनीच हस्तक्षेप करावा, रिपब्लिकन पार्टीची मागणी
- फडणवीसांचा नवा डाव, ना मोदी ना पवार थेट लिहिले सोनिया गांधींना पत्र
- ‘सत्ताधारी असूनही अशोक चव्हाणांना टीकेचीच सवय’
- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतके काम कोणत्याच नेत्याने केले नाही – चंद्रकांत पाटील