मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मुलीबद्दल एक विधान केलं होतं. त्याची चर्चा संपुर्ण राज्यात रंगली होती. तसेच त्यांच्या विधानांवर राज्यातील अनेक नेत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच यावर आता स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी यावर वक्तव्य केलं आहे.
पुणे स्थायी समिती अध्यक्ष अधिकार वाद; महापालिकेच्या विरोधात हेमंत रासने थेट न्यायालयात
जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या मुलीबद्दल वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की, माणसाला भीती खात असते. रात्री 3 वाजता टकटक झालं, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता जास्त असते. कुणाच्या घरात कोण घुसेल हे ध्यानी मनी स्वप्नीचं नसतं. यात ज्यांचा तुमच्या राजकारणांशी संबंध नसतो, अशा माणसांचे हाल होतात. माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय ? परंतु तिला जर उद्या नुसतं बोलवलं, तरी ती आत्महत्या करेल, असं खळबळजनक वक्तव्य जितेंद्र आव्हांडानी केलं.
“सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार
जितेंद्र आव्हाडांच्या व्यक्तव्यावर सदाभाऊ खोत यांनी ट्विट केलं आहेय. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठ्या होतील. हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण मुलगी पाठवणार आहात का ? असा सवाल त्यांनी जितेंद्र आव्हाडांना केला आहे.
राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती
देशातील हिंसक घटनांवर आता पर्यंत अनेकांनी अशा प्रकराचे वक्तव्य केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता अमीर खानने देखील अशा पद्धतीचा वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्याला सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल केलं होतं.
Read also:
- ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा ‘मनसे’ विशेष शो दाखवला जाणार; मनसे ‘ते’ ट्विट चर्चेत
- महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाला तर राजकारण सोडून देईन: अरविंद केजरीवाल
- “आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ते..”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला सतेज पाटलांचं प्रत्युत्तर
- “बंटी पाटील हा माणसं खाणारा माणुस”; चंद्रकांत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
- आयुक्त कैलाश जाधवांच्या बदलीचे नक्की कारण काय? नाशिक पालिकेत रमेश पवार यांची नियुक्ती