पुणे : आर्यन खान अटक प्रकरणी पंच किरण गोसावी याने शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर भाजपही बॅकफूटवर गेली आहे. ‘समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही’ अशी सावध प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी आर्यन खान अटक प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
माझ्या मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे – संजयकाका पाटील
एनसीबीने मोठा गाजा वाजा करून क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीने या प्रकऱणी अटकही केली. मात्र, त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सैल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले होते. पण, १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता असा गौप्यस्फोट केल्याने या खटल्याला वेगळंच वळण लागलं आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
औरंगाबादच नाव बदलण्याची आमच्यात हिंमत आहे, तुम्ही मैदानात या, दाखवतो – चंद्रकांत खैरे
‘समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही. याप्रकरणी एनसीबीवर काही आरोप करण्यात आले आहेत. ज्यांनी कुणी केले आहेत, त्यांचीही चौकशी व्हावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनीही मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमून याप्रकरणाचा खोलवर तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सखोल तपासाची मागणी केली आहे.
Read Also :
- ड्रग्स प्रकरणात एनसीबीला खोटे ठरवण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार – प्रविण दरेकर
- महाविकास आघाडी सरकार नसते तर छगन भुजबळ मंत्री म्हणून दिसलेच नसते – संजय राऊत
- भाजप खासदाराला साधा निवडणुकीचा अर्ज भरता येत नाही, याला काय म्हणायचं – गुलाबराव पाटलांचा टोला
- पिंपरी चिंचवडनंतर आता शरद पवारांची पुणे महापालिकेकडे कूच; दिवाळीनंतर सत्तांतराची रणनिती आखणार!
- आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळा गोंधळ संपेना; एकाच वेळी चार परिक्षांचे वेगवेगळे केंद्र, विद्यार्थी संतापले