मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर इतर काही मागण्या देखील ठेवल्या. या भेटी दरम्यान अजित पवार आणि अशोक चव्हाणांचीही उपस्थिती होती. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट झाल्याचे देखील सांगितले जाते. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.
बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?, असा खोचक टोला लगावत संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.
आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2021
‘आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .’ असे ट्विट करत संदीप देशपांडेंनी दोन्ही नेत्यांच्या भेटीवरून टोला लगावला आहे.
दरम्यान, ही भेट औपचारिक स्वरुपाची होती. ज्या विषयासाठी ही भेट झाली ते सर्व पंतप्रधानांनी एकून घेतले आहे. आता पीएम ते सर्व विषय सोडवतील, अशी अपेक्षा भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
Read Also :
- ‘खासदारकीला कोणताही धोका नाही’, नवनीत राणांना विश्वास
- पुण्यात फॅक्टरीला आग लागून मोठी जिवितहानी, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींनी मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली’
- ‘पवारांच्या ड्रावरमधून पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी अजितदादांबरोबर भाजपची कोण-कोण लोकं होती?’