मुंबई : राज्यात उद्भवलेल्या या अभूतपूर्व परिस्थितीवरून, आता आरोप-प्रत्यारोपांना आणि टीका-टिपण्णीला सुरुवात झाली असून, मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून विरोधकांवर टीका करत, त्यांना आव्हान दिलं आहे.
दोन दिवसात पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार; शरद पवारांची घोषणा
“जनतेला मदत करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, पण केंद्राचीही म्हणून काही जबाबदारी आहे. केंद्राला राज्यातून सर्वाधिक कर जातो. केंद्र बाप आहे,” असं म्हणत, “केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मंत्री आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या सहीचा २ हजार कोटींचा चेक घेऊन राज्यात यावं. आम्ही त्याचं वाजत-गाजत स्वागत करू,” असा आव्हानात्मक टोला केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना लगावला आहे.
‘जनता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय’, नारायण राणे यांची टीका
काही दिवसांपूर्वी राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले नारायण राणे यांनी तळीये आणि चिपळूणचा दौरा केला होता. तसेच, इतरही काही मंत्री राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौरा करणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनीही या नुकसानीचा आढावा घेतला असून, या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने, नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन
तसेच, “अशा घटना घडतात तेव्हा बचाव कार्यात कोणतेही अडथळे येऊ नये हा एक नियम आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करणं, राजकीय दौरे करणं, अधिकाऱ्यांवर आरोप करणं, त्यांच्यावर हल्ले करणं असले प्रकार थांबले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात वेदना आहेत. हा महाराष्ट्र आपला आहे. ही काही श्रेयाची लढाई नाही. आणि कुणाला असे वाटत असेल तर त्यांची माणुसकी शून्य आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
…..म्हणून चढला मंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांचा पारा
दरम्यान, कोकण कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडमध्ये अतिवृष्टीने हाहा:कार उडाला आहे. यामुळे आत्तापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. ९०,००० जणांचे स्थलांतर केले गेले असून, निसर्गाच्या या प्रकोपात तब्बल २५ हजार ५६४ जनावरं दगावली आहेत.
Read Also :
- नागपूर महापालिका: ‘तुम्हीच उमेदवार ठरवा, आता गटबाजी खपवून घेणार नाही’ – नाना पटोले
- आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे
- भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात….
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस
- नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर