दिल्ली : शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’मधून आज काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सकाळी पत्रकारांशी बोलताना, काँग्रेसवर तोंडसुख घेतले. “काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम आहे,” अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, याचा समाचार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला असून, त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
“सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे ‘झोकदार’ लोकच पक्ष आणि संघटन टिकवतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे आता नेतृत्व राहिलेले नाही. पक्षात डरपोक लोकांना जागा नाही, असे राहुल गांधी म्हणतात, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले, तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल!” अशी टीका सामानातून काँग्रेसवर करण्यात आली आहे.
पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
यावर उत्तर देताना, “मी सामना वाचत नाही, मी प्रतिक्रिया देणार नाही. कोणी काय टीका करावी, हा लोकशाहीत ज्याचा त्याचा अधिकार आहे. तसेच, त्यावर प्रतिक्रिया द्यायची की नाही हा आमचा अधिकार आहे. पण, सातत्याने एखाद्या पक्षाकडून एकत्र राहूनही बोललं जात असेल, तर या गोष्टीचा आम्ही एकदा विचार करू. आम्हला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सुईपासून-रॉकेटपर्यंत या देशाची उभारणी काँग्रेसने केली. त्यामुळे गांधी परिवारावर टीका करणाऱ्याने हे लक्षात ठेवावं; की सूर्यावर थुंकल्यानंतर ते आपल्याच अंगावर पडतं,” असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
संसदीय समितीच्या बैठकीत मोदींनी उठवले, काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह, म्हणाले…
दरम्यान, नाना पटोलेंच्या राज्यात दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला, काँग्रेस हाय कमांडकडून होकार दिला गेला असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेस पक्ष लढणार असण्यावर यामुळे आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्य प्रभारी एस.के. पाटील आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांच्यात दीड तास बैठक झाली. यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींना नक्कीच वेग येणार आहे.
Read Also :
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा
- भाजप-राष्ट्रवादीच्या दोन युवा नेत्यांमध्ये जुंपली, फडणवीसांवरच्या टीकेला दिले ‘गावरान तुपाने’ प्रत्युत्तर
- आरक्षण मिळवून न देण्यामागे ‘या’ नेत्यांचा हात, भाजपने उघड केली झारीतील शुक्राचार्यांची नावे
- धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड