मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चांगलाच वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, अखेर शिवसेना आणि भाजपने काडीमोड केला. यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ऐतिहासिक महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली असली तरीही अजुनही भाजप आणि शिवसेनेच्या तुटलेल्या युतीवरुन चर्चा सुरुच असते. नुकतेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तुटलेल्या युतीविषयी भाष्य केले होते. आता त्याला संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे.
राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसोबतच्या युतीविषयी भाष्य केले होते. शिवसेनेसोबतची युती ही आमची ऐतिहासिक चूक होती असे वक्तव्य मुनगंटीवारांनी केले होते. यावर संजय राऊतांनी उत्तर तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘माणसाचे मन भरकटले की अशी माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात. राजकारणामध्ये विरोधीपक्ष ज्या पद्धतीने भरकटला आहे, ते पाहाता त्यांच्याकडून आपण कोणत्या वक्तव्याची अपेक्षा ठेवणार? असा बोचरा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.
अखेर मुंडे साहेबांसह बीडकरांच स्वप्न सत्यात उतरलं; अहमदनगर ते आष्टीदरम्यान धावली ट्रेन
भाजप नेत्यांच्या युतीविषयीच्या विविध वक्तव्यांवर भाष्य करताना संजय राऊतांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘कधी तुम्हाला राष्ट्रवादीसोबत जावे वाटते. तर कधी शिवसेना हाच आमचा नैसर्गिक मित्र असल्यासारखे तुम्ही म्हणता, तर कधी अजून काही तरी म्हणता. या महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना शांतपणे केदारनाथला जाऊन महिनाभर बसण्याची गरज आहे. त्यांचे डोके थंड झाले, की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन राजकारण करायला हवे. त्यांची मनस्थिती सध्या चांगली नाही. त्यांचे मनस्वास्थ्य चांगले व्हावे, म्हणून मी या नवीन वर्षात इश्वराकडे प्रार्थना करतो’ असा खोचक टोला देखील संजय राऊतांनी लगावला आहे.
Read also:
- “नॉट रिचेबल” नितेश राणे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह; सतीश सावंत यांच्या पराभवावर राणेंची पोस्ट
- कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?
- आज मध्यरात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध; ‘अशी’ असणार नवीन नियमावली
- महाविकास आघाडीला मोठा धक्का; सतीश सावंत पराभूत..!
- ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!