मुंबई : गोरेगाव पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आजही कोर्टोने दिलासा दिला नाही. त्यांची आज इडीची कोठडी संपत आली होती. अनेक शिवसैनिकांना आशा होती की, संजय राऊत यांना आज न्यायालयाकडून बेल मिळेल. परंतु इडी संजय राऊतांच्या मागे हात धूवून लागली आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
“शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना असं समीकरण”; दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात 1 हजार 34 कोटीं रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर संजय राऊतांना पीएमएलए कायद्याअंतर्गत इडीने अटक केली होती. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपत आल्याने त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा 14 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
“आपल्याला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येकाला पक्षात समाविष्ट करून घ्या”; जयंत पाटील
त्यानंतर त्यांची रवानगी मुंबई येथील आर्थर रोडवरील तुरूंगात करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा मुक्काम आता 4 ऑक्टोंबर पर्यंत तुरूंगात राहणार आहे. याआधी संजय राऊत यांनी जामीन अर्जसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला इडीने जोरदार विरोध दर्शविला. त्यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read also
- “राम मंदिराआधी अयोध्यात योगीच मंदिर; काॅंग्रेसचा खोचक टोला, म्हणाले, पहिले 33 कोटी होते, आता..;”
- “किरीट काका भाजप व शिंदे सरकारने तरी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं”, मिटकरींना डिवचलं
- मतदारसंघात एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही : चंद्रकांत पाटील
- “माॅंसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्याऱ्या कदमांना सुट्टी देऊ नका भावांनो”; सुषमा अंधारे भडकल्या
- “मला काही समजतं नाही, राज्यात काय नेमकं काय चाललंय”; राज ठाकरेंचं भाष्य