सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी उआपली बाजू मांडली आहे. यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात पाठिंबा दर्शवला आहे.
सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला रिप्लाय करत युवक काँग्रेसतर्फे पाठिंबा दर्शवला आहे. तसंच या प्रकरणी आपण चिंता करू नये, आपण करीत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे, असं ते म्हणाले आहेत. आदित्यजी, चिंता करु नका…. जनता हुशार आहे, मुंबई पोलिस सक्षम आहे की बिहार पोलिस ? हे शेमडं पोरगं पण सांगू शकेल… आपण करीत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे, असं सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.