निर्दोष जनावराचा बळी देऊन त्याचं सेवन केल्याने पुढील जन्मात त्यालाही बकरा व्हावं लागेल आणि लोक त्याला खातील. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं, असंही नंदकिशोर गुर्जर यांनी सांगितलं आहे.
सनातन धर्मात आधी बळी दिला जात होता, पण आता त्याऐवजी नारळ फोडला जातो. बकरा कापला जात नाही. त्याचप्रमाणे इस्लाम धर्म मानणाऱ्यांना माझी विनंती आहे. तेदेखील आपल्या पवित्र गोष्टीची, आपल्या मुलांचा बळी देत नाहीत. जर कोणी म्हणत असेल मला कुर्बानी द्यायची आहे तर त्याने आपल्या मुलांची कुर्बानी द्यावी, असं नंदकिशोर गुर्जर म्हणालेत.
दरम्यान, देशात सध्या कोरोनाने थैमान घातलं असून अद्यापही त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं नाही. संकटाच्या या काळात सरकार वारंवार लोकांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन करत आहे.