राज्यात आणि देशात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर सर्वोतपरी काळजी घेणेही मोठी जबाबदारी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. विद्यार्था शिक्षणापासून वंचित राहू नये शिवाय, त्यांचं आरोग्यही आमची प्राथमिकता आहे, त्या दृष्टीने आम्ही शिक्षण विभागामार्फत काम सुरु केलं. अनेक मुलं आता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवण्याचं शिक्षकांनी केलं. शिक्षक केवळ शिकवण्याचं नाही तर शिक्षणासाठी मदतीचंही काम करत आहेत. लॉकडाऊमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही आम्ही कमी केला, जेणेकरुन विद्यार्थ्यांवर कोणतंही दडपण येऊ नये, अस शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं
गेल्या सरकारपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण भरतीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत. राज्यात शिक्षण भरतीची आवश्यकता आहे. त्याबाबत काम सुरु आहे. काही निर्णय मंत्रिमंडळामार्फत घेतले जातात, मात्र सरकार म्हणून याबाबत सकारात्मक आहोत. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शिक्षक सेवकांच्या बाबतीत वित्त विभागाशी चर्चा सुरु आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.