मुंबई : मुबंईमधील अँटोप हिल येथील भरणी नाका परिसरात महागाई विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन सुरु असताना बैल गाडीवर मुबंई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्यकर्ते उभे राहून घोषणा देते होते. यावेळी बैलगाडीवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते जमा झाल्याने बैलगाडी कोसळली. या घटनेत काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.
शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी गुरूवारी (दि. ८) सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात सायकली चालवून आपला निषेध नोंदवला. त्यांचे हे अनोखे सायकल आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी पावसात भिजत एकच गर्दी केली होती. त्यातच आता आज (शनिवारी) मुंबईत आंदोलन केले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद: युवराज पाटलांना दिलेला शब्द पाळणार का मंत्री हसन मुश्रीफ?
इंधन दरवाढी विरोधात आज (शनिवारी) काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा होता. मात्र या मोर्चाचा फज्जा उडाला. कारण ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती, ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते या बैलगाडीवर चढले. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने कोणला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले असून बैलाना जखमा झाल्या आहेत.
Read Also :
- जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस
- अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
- जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर, नाना पटोलेंचा आक्षेप; दाखल केलेल्या याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी