औरंगाबाद : यापुर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्याठिकाणी जमिनीवर बसून सभा झाली होती. आताची मुख्यमंत्र्यांची झालेली सभा ही खुर्च्यावर बसून झाली, यामध्ये मोठा फरक आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेला आलेले 25 टक्के हे पैठणचे तर 75 टक्के बाहेरून लोक आले होते. यामध्ये शेगाव, चिखलठाणा, घनसांवगी, सिल्लोड याठिकाणाहून आले होते. तसेच काही लोक ही झोपडपट्टीतून 300 ते 500 रूपये घेऊन गेले. त्याचा पुरावे देखील असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
“उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला होता माहित नाही?”; भास्कर जाधवांची बांगरांवर टिका
आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेला खरी गर्दी होती. त्यावेळी आम्ही जर खुर्च्या टाकल्या असत्या तर भलीमोठी रांग दिसली असती. यासभेला शहाजी बापू पाटील यांनी व्यासपीठावर चंद्रकांत खैरे आणि आंबादास दानवेंसाठी दोन खुर्च्या गर्दी बघण्यासाठी ठेवायला पाहिजे होत्या. असा घणाघात त्यांनी केला होता. त्यावर बोलताना खैरे म्हणाले की, त्यापेक्षा तुम्हाला मातोश्रीवर जाऊन चांगली खुर्ची देतो, परंतु तुम्ही या इकडे. असं आव्हान त्यांनी केलं आहे.
“दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांनी आपल्याच मतदारसंघात एकाला बोका म्हटलं आहे. त्यानंतर मला मतदार संघातून फोन यायला लागले की तुम्हाला बोका कसा वाटला? त्याचवेळी गर्दी बघून त्यांना डाऊन करण्यासाठी त्यांनी बोका म्हटलं. तसेच त्यांना जसं चकवा म्हणतात. तसेच एकनाथ शिंदे यांचा ताफा गेल्यानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावर गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. त्यावर बोलताना म्हणाले की, गद्दारीचे जंतू 27 सप्टेंबर नंतर मरणार असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
“हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्वत: चं खातं एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. त्याचं त्यांनी उपकार मानायला हवं. तसेच एकनाथ शिंदे यांचं भाषण काही दमदार नव्हतं. तसेच मला असं पण दिसलं की ते घाबरलेले होते. तसेच त्यांनी न्यायाधीशांना जर वाकून नमस्कार केला तरी येणाऱ्या 27 तारखेचा निकाल त्यांच्यासाठी मोठा धक्कादायक ठरणार आहे. असं देखील ते म्हणाले.
Read also
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
- “आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
- पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
- “जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
- “पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”