जळगाव: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी मध्ये शरद पवार आणि प्रशांत किशोरी यांच्यामध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली आहे. मुंबई येथे झालेल्या भेटींनंतर देशभरात राजकीय चर्चेला उधान आले आहे. तसेच या भेटीनेनंतर येणाऱ्या काळात राजकीय भुकंप होणार का?. ? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर दाखल झाले. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात बराच वेळ चर्चा सुद्धा झाली. मुंबईत झालेल्या या भेटीनंतर संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. येत्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव येथे संजय राऊत म्हणाले, प्रशांत किशोर हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांनी आमच्यासाठी काम केले आहे, काँग्रेससाठी काम केले आहे. त्यांच्यासोबत अनेक राजकारण्यांच्या भेटी होत असल्या तरी त्या पक्षाच्या विस्ताराच्या संदर्भात होऊ शकतात. त्यामुळे प्रशांत किशोर हे शरद पवार यांना भेटल्याने राजकीय भुकंप होण्याची शक्यता नाही.
भेटीनंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किसोर यांच्याकडे देण्यात आलेली नाहीये. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.
२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकारच – देवेंद्र फडणवीस
या भेटीवर देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं, भाजप विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी ही बैठक झाली असल्याचं बोललं जात असताना यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल यात शंका नाही.
Read Also :
- ‘यूपीएत किती पक्ष उरलेत हे तपासण्याची वेळ आली आहे, मात्र काँग्रेस शिवाय देशात कोणतीही आघाडी अशक्य’
- ‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय- नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
- ‘चंद्रकांत पाटील किंवा भाजपतील कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही’ – संभाजीराजे
- आपलं इंदापूर आणि मुंबईच बरी, सोलापूरचे पालकमंत्री पद नकोच, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती
- स्वतःचं अपयश झाकण्यासाठी, “आलं अंगावर की, ढकललं केंद्रावर!”; प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला