पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या गोरेगाव पत्रावाळ चाळ भ्रष्टाचार प्रकरणी तुरूंगात आहेत. त्यांना अलिकडेच न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची 14 दिवस न्यायालयीन कोठडी आणखी वाढवण्यात आली आहे. यातच आता पत्रावाळ चाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र देखील दिलं आहे. त्यावर आता शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरातला उद्योगाचा पेटारा , महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा ” “गुजरात तुपाशी , महाराष्ट्र उपाशी”
शरद पवार म्हणाले की, पत्राचाळी संदर्भात जी काही बैठक झाली त्याचा तपशील सर्व नमुद आहे. तत्कालीन सचिवांची त्यावर सही आहे आणि त्याचा इतिवृत्तांत तुम्हाला मी आता पत्रकार परिषद झाली की सर्वांना देतो. तरीही काही चौकशी करायची असेल तर ती लवकरात लवकर कार आणि सगळं खोटं ठरलं तर मग काय? असा सवाल शरद पवारांनी भाजपला केला आहे.
“एसटी महामंडळाला निधी देताना हात आखडते का घेत आहेत?” रोहित पवारांचा सवाल
बारामती दौऱ्यावर केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण येत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की, देशात आता भाजपला अनुकुल वातावरण राहिलेलं नाही. नागरिकांमध्ये खुप अंसतोष आहे. याची कल्पना भाजपला आहे. त्यामुळेच देशात विविध लोकसभा मतदार संघांची जबाबदारी पक्षाच्या नेत्यांना निश्चित करून दिली जात आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी निर्मला सितारमण यांचं स्वागत केलं आहे. पण याआधीही पंतप्रधानांसह इतर बडे नेते बारामतीत येऊन गेले आहेत. याची आठवण करून देत भाजपच्या मिशन बारामतीचा काही परिणा होणार नसल्याचंही शरद पवार म्हणाले.
“मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य? खोके सरकारने याचं आत्मचिंतन करावं”; सुप्रिया सुळे
दरम्यान, गोरेगाव पत्रावाळ चाळ प्रकरणी संजय राऊत यांना इडीने अटक केली आहे. तसेच यामध्ये भ्रष्टाचार केलेले सर्व पैसे संजय राऊतांनी ठाकरे या चित्रपटात लावले असल्याचे इडीने आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also
- “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल
- “तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगा”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
- “रामदास कदमांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिला कदमांना इशारा
- “राष्ट्रवादीची तळी उचलून तुमच्या पक्ष प्रमुखांनी संपूर्ण पक्ष भिकेला लावला”
- संजय राऊतांसोबत आता शरद पवारांची देखील पत्राचाळ प्रकरणी चौकशी करा; भाजप आमदाराची मागणी