शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकासआघाडीची स्थापना कशी झाली? आपण शिवसेनेसोबत का आणि कसे गेलो? याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांची ही मुलाखत घेतली आहे.
शरद पवारांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीवर आरपीआयचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्या साठी शरद पवार यांनी शिवसेने सोबत राहू नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.
राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राहात असून, त्याच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यात अनेक निर्णय हे राष्ट्रवादीला घेता येत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल आहे. राज्यात जरी तीन पक्षांचे सरकार असले तरी ही सेना इतर पक्षांचे ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि देशाच्या भल्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला हवा. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्या साठी शरद पवार यांनी शिवसेने सोबत राहू नये, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.