पुणे – राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मोठे संकेत दिले आहे. राज्यातही आपले सरकार असले पाहिजे. केंद्रातही आपलेच सरकार पाहिजे. त्यासाठी पवारसाहेब देशातील सर्व पक्षांतील नेत्यांना एकत्र करण्याचे काम करत आहेत. नव्याने काही मांडण्याचा व करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी शरद पवार हे देशात नवी राजकीय समीकरणे जुळवण्याच्या प्रयत्नांत असल्याचे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले.
देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत. रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत. महागाई वाढत चालली आहे आणि केंद्र सरकार सरकारी कंपन्या विकायला काढत आहे. उत्पादनाचं साधनच नाही. विकायचं आणि मजा मारायची ही भूमिका केंद्रातील सरकारची आहे, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
केतकी चितळेवर राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी शाईफेक अन् अंडी फेकली; पोलीस ठाण्याबाहेरच घडली घटना
यावेळी त्यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. केतकी चितळेने शरद पवारांवर केलेल्या पोस्टच्या निषेधार्थ काल ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती अंडी फेकली होती. या घटनेची स्थानिक पोलीस चौकशी करून जे कुणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांबाबत जे बोलतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ असे म्हटले होते. त्यावर कार्यकर्त्यांनी असे करू नये. भावना असतात हे मान्य आहे. पण प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात. त्याचे पालन केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
“शिवसैनिकांमध्ये आम्हाला बाळासाहेब ठाकरे दिसले”; आदित्य ठाकरे
पवारसाहेब सतत लोकांसाठी काहीना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकृती ठीक नसताना ते काम करत असतात. पण काही लोक पवारसाहेबांवर विनाकारण काही संबंध नसताना खालच्या भाषेत टीका करतात. मात्र काही लोक याविरोधात पुढे का येत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
Read also:
- मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता पुणे.. राज ठाकरेंची तोफ आता कोणावर धडाडणार?
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
- नाना पटोलेंची राष्ट्रवादीविरोधात तक्रार; भाजप नेते म्हणाले की, “नाना पटोलेंचं वक्तव्य मूर्खपणाचं लक्षण”
- 2024 चा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा असावा; रावसाहेब दानवेंनंतर आठवलेंचं वक्तव्य
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार