मुंबई : राज्यातील यंदाचं अधिवेशन एका विषयाने फार गाजलं तो म्हणजे विधानसभा अध्यक्षपद. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात त्यावरुन आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. सराकारची मागणी होती की मतदान हे आवाजी पद्धतीने व्हावे परंतु विरोधी पक्षाने त्याला विरोध केला. गुप्त पद्धतीने मतदान घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली. त्यावरचं आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आली आहे.
माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणी नेता विधानसभा अध्यक्ष नको होता म्हणून शरद पवार व उद्धव ठाकरेंनी “आवाजी मतदानाचे” नाटक केले का? असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला आहे. महाविकास आघाडी कडे 175 आमदार यांच्या समोर भाजपकडे 105 आमदार असताना गुप्त मतदानात काँग्रेसचा स्पीकर सहज निवडून आला असता. राज्यपालांवर खापर फोडून काँग्रेसला पपलू बनवण्याचे काम ठाकरे पवार यांनी केले असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
दरम्यान राज्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल यांच्या पत्राच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळाला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते म्हणून सरकाराने अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली नाही अशी बातमी साम टीव्हीने दिली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत भाषेत पत्र लिहून मी घटनाबाह्य काम करणार असे सांगितले. आवाजी मतदान हे घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी पत्राद्वारे म्हणले. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले.
Read also:
- “नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
- “संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेच”; विनायक राऊतांचा आरोप
- राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस
- “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती”
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…