गोवा – राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पाठवले आहे. त्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं गोव्यात काँग्रेस पक्षाला मोठा झटका देण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादीतील नेत्यांच्या एक गट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी यांच्यासोबत गोव्यात तिसऱ्या आघाडीसाठी अनुकूल आहे. एनसीपीचे सरचिटणीस आणि गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम आणि जीपीसीसी नेत्यांना युतीच्या परिस्थितीबद्दल त्यांच्या पक्षाची नाराजी सांगितली आहे. काँग्रेसचा काळ संपत चालला आहे, असे पटेल यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती? अजित पवार की एकनाथ शिंदे?
राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितलं, आम्हाला माहिती मिळाली की, गोव्यातील काँग्रेस नेते निवडणुकीच्या रणनीतीवरुन आपसात वाद घालत आहेत आणि राष्ट्रीय नेते आतापर्यंत ते वाद सोडवण्यात असमर्थ राहिले आहे. राष्ट्रवादीने खूप वाट पाहिली आहे, पण आम्ही अंतहीन वाट पाहू शकत नाही.
पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाओ यांच्यासह गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीएमसीसोबत युतीसाठी चर्चेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शरद पवार भाजपविरोधी आणि बिगर काँग्रेस तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. ज्यात तृणमूल, आप, राष्ट्रवादी आणि इतरांचा समावेश असेल.
देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
राव यांनी नुकतंच सांगितलं होतं की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टी यांच्याशी युती करण्यासाठी चर्चा करेल. मात्र गोव्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती करण्याबाबत विभागले आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस स्वबळावर चांगली कामगिरी करू शकते, असं राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध करणाऱ्यांचे मत आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीसोबतच्या युतीला विरोध करणार्या एका गटानं त्यांचे नेते विजय सरदेसाई यांनी काँग्रेसशी विश्वासघात केला आणि २०१७च्या निवडणुकीनंतर भाजपला सरकार स्थापन करण्यात मदत केली असे नमूद केले.
Read Also :
- ‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब
- माझा पराभव झाला, म्हणून कट कारस्थान करणाऱ्यांनी धिंगाणा घातला; शशिकांत शिंदेंचा आरोप
- एसटी कर्मचाऱ्यांचा पण गिरणी कामगार करणार का? संजय राऊतांचा हल्लबोल
- खोत-पडळकरांनी आंदोलन सोडलं, पण आंदोलक एसटीची घंटी वाजू देणार नाही..
- फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर आले समोर; मुंबईत दाखल झाल्याची माहिती