मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यासाठी एक अटही ठेवली आहे. राष्ट्रवादीची एक जागा निवडून आल्यानंतर राहिलेली मते छत्रपती संभाजीराजेंना देणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, राज्यसभेसाठी अन्य राजकीय पक्ष आणि आमची या संदर्भात अजून काही चर्चा झाली नाही. आमच्याकडे एक उमेदवार निवडून आल्यानंतर उरलेली 10 ते 12 मते आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना देणार आहोत.
गाढवांना लाथ मारण्याआधीचं त्यांना आम्ही सोडलं; मुख्यमंत्र्यांनी भाजपला डिवचलं
संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष राज्यसभेची निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. आता संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पहिली सही केली आहे. राज्यातून संभाजीराजे छत्रपती यांना त्यांचा पहिला पाठिंबा मिळाला आहे.
येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यात एकूण सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात भाजपकडे 2 तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक एक जागा येणार असून सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे.
“हिंदुत्व आमचा श्वास अन् मराठी आमचा प्राण” मुख्यमंत्र्यांचं मुंबईत जोरदार भाषण
दरम्यान, राज्यसभेची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वत:ची ‘स्वराज्य’ संघटनेबरोबरच राज्यसभा अपक्ष लढण्याची घोषणा केली. राज्यातील सर्वपक्षीयांना आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला पहिल्यांदा प्रतिसाद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देत त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. यामागे छत्रपती घराण्यावरील प्रेम आहेच, त्याचबरोबर मराठा आरक्षण व विविध मागण्यांसाठी संभाजीराजे यांनी मुंबईत आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. या उपोषणाने राज्य सरकार अडचणीत सापडणार म्हटल्यावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली, त्यांचा शब्द मानून संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतले. त्यामुळेच संभाजीराजे यांचे सरकारला सहकार्य असल्याचे जाहीर वक्तव्य पवार यांनी केले होते. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात संभाजीराजे यांची महाराष्ट्रात ताकद वाढली असून, त्या ताकदीचा उपयोग आघाडी करून घेण्याची खेळीही असू शकते.
Read also:
- शरद पवार लवकरच राष्ट्रीय राजकारणात; दिलीप वळसे पाटील यांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत
- मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता पुणे.. राज ठाकरेंची तोफ आता कोणावर धडाडणार?
- ”गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न”; राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार
- नाना पटोलेंची राष्ट्रवादीविरोधात तक्रार; भाजप नेते म्हणाले की, “नाना पटोलेंचं वक्तव्य मूर्खपणाचं लक्षण”
- 2024 चा मुख्यमंत्री ब्राम्हण समाजाचा असावा; रावसाहेब दानवेंनंतर आठवलेंचं वक्तव्य