शिर्डी: राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या Shirdi Saibaba Sansthan Trust अध्यक्षपदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आलेली आहे. अध्यक्षपदासाठी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चुरस लागलेली आहे.
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
अध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत आता अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शिर्डीमध्ये रोजच विश्व्स्त मंडळ जाहीर होत आहे. त्याबाबत याद्या देखील जाहीर होतात मात्र महाविकास आघाडी सरकारला वाटेल तेव्हा ते विश्व्स्त मंडळ जारी करू शकतात असा टोला डॉ. सुजय विखे यांनी मारला आहे. शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलत असताना शिर्डी शहरातील साई मंदिर कधी उघडणार याकडे भाविकांचे डोळे लागलेले आहे.
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
शिर्डीतील मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार निर्णय घेणार असले तरी देखील मंदिरे लवकरात लवकर उघडावी यासाठी पक्षपातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील यापूर्वीच निवेदन देण्यात आलेले आहे. मंदिरे उघडण्याच्या अगोदर शिर्डीतील प्रत्येक घरातील ४५ वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला लसीचा एक डोसतरी देण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र राज्य सरकारच्या वतीने मंदिरावर विश्व्स्त नेमण्याचा घाट घालण्यात येत आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
हे पण वाचा
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन