कोल्हापुर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज्यात एकच गोंधळ उडाला होता. राज्यातील सगळ्याच राजकीय नेत्यांनासमोर हा पेच निर्माण झाला होता. त्यातच शिवसेना सहाव्या जागेसाठी ठाम होती. तसेच शिवसेनेने संभाजी राजेंना शिवबंधन बांधण्याची ऑफर देखी दिली होती. मात्र ती ऑफर संभाजी राजे यांनी धुडगावून लावली.
..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
त्यामुळे शिवसेना सहाव्या जागेला कोणाला उमेदवारी देणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं होतं. त्यामुळे आज शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सहाव्या जागेला फैसला लावला आहे. कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची संधी मिळणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे औरंगाबादचे चंद्रकांत खैरे यांना दुसऱ्यांदा डावलण्यात आले.
राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
औरंगाबादचे सलग चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांच्या नावाची सध्या राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा होती. मात्र यावेळीही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ते यावर काय प्रतिक्रिया देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.? तसेच सध्या औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न देखील खुप गाजलेला असून त्याठिकाणी शिवसेनेला घेऱणयाचा प्रयत्न भाजप करीत आहे.
अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 31 मे अजून येत्या 10 जून रोजी मतदान होत आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला 2, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना आणि काॅंग्रेसला प्रत्येकी एक जागा निश्चित मिळणार आहे. मात्र सहाव्या जागेचा पेच निर्माण झाला. शिवसेने अगोदरच सहावी जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जागेवर कोणाची वर्णी लागते ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “बाळासाहेबांवरील राऊतांनी बनवलेला चित्रपट भयानक आपटला, पण दिघे साहेबांवरील अजूनही सुरू”
- धार्मिकतेवरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..”; गृहमंत्र्यांनी मनसेला फटकारलं
- “ओबीसी हा भाजपचा डीएनए, तर ठाकरे सरकार आरक्षणाचे हत्यारे” फडणवीसांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार
- “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान”; मनसेचा शरद पवारांवर निशाणा
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन