मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या घटनेत केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्यावर आरोप करण्यात आले. अजय मिश्र यांचा मुलगा आशिषनं शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचं सांगितलं गेले. मंत्र्यांच्या ताफ्यातील एक वाहन ठरवूनच शेतकऱ्यांच्या अंगावर घालून, त्यांना ढकलत नेऊन चिरडले, असा व्हिडिओही समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागल्याने भाजपची अडचण झाली होती.
कोकणात शिवसेनेची हप्तेखोरी, उद्याच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या समोरच नावं जाहीर करणार – नारायण राणे
लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आले आहेत. महाराष्ट्र बंदमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले आहे. उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हाॅटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सामील असणार नाही.
मोठी बातमी: शिवसेना स्वबळावर लढणार; राष्ट्रवादीला धक्का, काँग्रेस-भाजपलाही टक्कर देणार
महापौर नरेश म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकतें रस्त्यावर उतरले . यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले . दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यात महत्वाच्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तोडफोडीच्या घटना पाहता बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. बंदच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
Read Also :
- बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी दम असेल तर रस्त्यावर उतरुन दाखवावं; राऊतांचा इशारा
- बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; महाराष्ट्र बंदवरून अशिष शेलारांचा हल्लाबोल
- मुंबईत बेस्ट’च्या ८ बसेसची तोडफोड; ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण
- नवाब मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?
- 11 ऑक्टोंबरच्या देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून; शिवसेना पुर्ण ताकतीने सहभागी होणार