मुंबई : राज्यातल्या मातब्बर राजकीय पक्षांपैकी एक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धानपनदिन आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत आयोजित केलेल्या एका सोहळ्यात, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाबद्दल असणारी आपली भावना, समाज माध्यमांसमोर बोलून दाखवली, तसेच सध्याच्या राज्यातल्या आणि देशातल्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी, सत्तेत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर स्तुतीसुमने उधळली असून, ‘कधीही वाटलं नव्हतं, आम्ही शिवसेनेबरोबर सरकार बनवू. मात्र, शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे,’ अशी भावना व्यक्त केली आहे.
‘हे आघाडी सरकार किती टिकेल, याबद्दल अनेक जण शंका उपस्थित करत आहेत, अजूनही केली जात आहे. मात्र, हे सरकार पूर्ण ५ वर्ष टिकेल आणि एवढंच नाही, तर त्यापुढेही लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टिनेही चांगली कामगिरी करेल,’ असा विश्वास देखील यावेळी त्यांनी दाखवला आहे.
दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते अजित पवार यांनी देखील या कार्यक्रमात बोलताना, ‘केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे,’ अशी टीका केंद्रावर केली आहे.
तसेच, “राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या मातीशी नातं सांगणारा पक्ष आहे, जनतेशी नाळ जुळलेला हा पक्ष आहे. आज करोनाचं संकट आहे. सरकार स्थापन केल्यावर चार महिन्यात करोनाचं संकट आलं. विरोधक वेगवेगळा प्रचार करतात पण सर्वोच्च न्यायालयानं, मुंबई हायकोर्टानं कौतुक केलं आहे. जगात काय चाललंय हे आपण पाहिलं, तसंच देशात यमुना, गंगेच्या तीरावरील दुर्दैवी चित्र आपण पाहिलं,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
- मोदी सरकार लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न करतंय; अजित पवार संतापले
- जातप्रणात पत्र ठरले अवैध: नवनीत राणा यांची खासदारकी जाण्याची कितीपत शक्यता?
- वाघाशी दोस्ती करणार?; चंद्रकांत पाटलांची इच्छा पुर्ण होवो.. संजय राऊतांच्या शुभेच्छा
- ‘राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव’
- ‘हे म्हणजे काँग्रेसच्या थोबाडीत मारण्यासारखं आहे’