मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र त्यांत्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमधून शिफ्ट करण्यात आलं आहे.
आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर 27 सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ईडीचे अधिकारी चौकशी करत असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअरमध्ये अॅडमिट करण्यात आलं. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये 4 दिवस उपचार करुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आता दुसऱ्या हॉस्पिटमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पुरात आतापर्यंत तब्बल 436 जणांचा मृत्यू; 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मुख्यमंत्री पाहणी करणार
आनंदराव अडसूळ यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये ईडीचे अधिकारी देखील आहे. 4 दिवस उपचारादरम्यान ईडीचे दोन अधिकारी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्येच होते. त्यांच्या तब्येतीची माहिती ते वारंवार डॉक्टरांकडून घेत होते. आताही दुसऱ्या हॉस्पिटमध्ये नेताना ईडीचे अधिकारी त्यांच्यासोबतच आहेत. आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतलं.
पुरामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार; उदय सामंत यांची माहिती
आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.
Read Also :
- भाजप-मनसे युतीबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील; प्रविण दरेकरांच्या विधानाने चर्चांना उधान
- सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं; त्रीस्तरीय प्रभाग रचनेवरून दादांनी टोचले कान
- शेतकऱ्यांना सर्वेतोपरी मदत करणार; पण सर्व माहिती मिळाल्यावरच, अरोदर नाही – अजित पवार
- ठरलं: ४ तारखेपासून शाळा सुरू होणार; परंतू, एका बेंचवर एकच विद्यार्थी असणार, वाचा नियमावली…
- काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेवर सोलापूरात गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण, वाचा सविस्तर…