मुंबई : प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांत राडा झाला. या राड्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुंबई, महाराष्ट्रात चालणं फिरणं अवघड होईल, असा इशारा शिवसेनेला दिला होता. यानंतर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे राणेंचा राजीनामा घेण्याची मागणी करत शिवसेना काय हे समजावून सांगू, असा पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
शिवसेना संपली…आहे कुठे? असे आजवर गिनीज बुकमध्ये नोंद करावी लागेल इतक्या वेळा नारायण राणे बोलले आहेत. त्यांचा शिवसेनेने त्यांच्या घरात आणि मुंबईतही पराभव केला आणि शिवसेना काय आहे हे दाखवून दिले आहे. तेव्हा हेच सरवणकर त्यांच्यासोबत होते. राणे कधी एका ठिकाणी टिकले नाहीत तर त्यांचा विचार कसा टीकेल? ही माणसं विचारपूस करायला जातात, याचा अर्थ नक्कीच समोरचा दुःखात किंवा अडचणीत आहे. केंद्रीय मंत्रीच जर अशा धमक्या देत फिरत असेल तर आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी त्यांचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे, अशी मागणी अरविंद सावंत यांनी मोदींकडे केली आहे.
“उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
नारायण राणेंनी झेड वा झेड प्लस सुरक्षा बाजूला ठेवून मोकळे फिरू द्या. एखाद्या शिवसैनिकासोबत चर्चा केल्यास तो देखील त्यांना शिवसेना समजावून सांगेल. कुणाच्या तरी आश्रयावर जगणाऱ्यांनी फुशारक्या मारू नयेत, असा टोला शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी नारायण राणेंना लगावला आहे.
“दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे
शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. मातोश्रीच्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू आहे. सदा सरवणकर हे आमचे मित्र आहेत. सध्या आमती युती आहे. मात्र युतीपेक्षाही ते आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. असे हल्ले करू नका, नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणं, बोलणं, फिरणं अवघड होईल त्यासाठी परवानगीची गरज लागेल, असा इशारा नारायण राणेंनी दिला होता.
Read also
- “उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला होता माहित नाही?”; भास्कर जाधवांची बांगरांवर टिका
- “दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
- “हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार
- सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
- तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल