मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना हनुमान चालिसाचं पठणाच्या भूमिकेवरून अटक करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना आणि राणा दाम्पत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती. तसेच नवनीत राणा यांनी पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत त्यांनी लोकसभा अध्यक्षांना देखील याबाबत प्रकरण लिहिलं होतं. यावरून आता शिवसेना नेत्या रूपाली सय्यद यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
“बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता बकरीसेना झाली”; नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात
मुंबई पोलिसांना हाकलुन लावण्याची भाषा केलीस तु तुझ्या घरी. त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली चाय बटर खारी. मुंबई पोलिसांचे नाव खराव करण्याचा प्रयत्न केलास जरी. आम्ही तक्रार करून उभं करू तुला गृहमंत्र्यांच्या दारी. अमरावतीची भाकरवडी. अशी खोचक टिप्पणी दिपाली सय्यद यांनी नवनीत राणा यांच्यावर लगावली आहे.
“कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, मग तो कुणीही असो”; राऊतांनी संभाजी राजेंना स्पष्ट सांगितले
मुंबईतील प्रकरणाबाबत नवनीत राणा यांनी अलिकडेच विशेषाधिकार समितीसमोर देखील आपली बाजू मांडली आहे. मुंबई पोलिसांविरोधातील तक्रारीनंतर नवनीत राणा यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवलं होतं. त्यावरून रुपाली सय्यद यांनी या प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.
“पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानंतर मुंबई शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राडा झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती.
Read also:
- राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
- अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
- “सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस
- राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपचाच डाव; बृजभुषण सिंह यांनीच दिली कबुली ?
- इडा पिडा टळो, अन् इडीचा ससेमिरा मरो; भावना गवळी यांच्यासाठी शिवसेनेकडून यज्ञ