मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. चाकरमान्यांना देखील याचा फटका बसला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधत मुंबईत ‘सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?’, असा सवाल केला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवली अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला, असे म्हणत राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर दिले. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा. टील यांना असले सुंदर विचार सुचतातच कसे?, याचा तपास केला पाहिजे. चंद्रकांत पाटलांचे ब्रिटिशांवर फारच प्रेम दिसते. त्यांना जाऊन बराच काळ झाला, असा टोला त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटलांसारखी माणसे मुंबईत येऊन आज जाहीरपणे बोलू शकतात, शिवसेना नसती तर तेही शक्य झाले नसते. मुंबईसाठी शिवसेनेच्या योगदानाची लांब यादी देता येईल, असेही ते म्हणाले.
Read Also :