पुणे : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील मावळ मतदार संघातील जागा ही शिवसेनेने पार्थ पवार यांच्यासाठी सोडून मनाचं मोठेपण दाखवावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. अशातच आता मावळ मतदार संघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर टीका केली आहे. तर या मागची भूमिका काय असणार हे आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
“कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश
श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काॅंग्रेसवर टीका करताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मी शिवसेना याठिकाणी दीड ते दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल, असं सांगितलं होतं. मावळ लोकसभा मतदारसंघात एक विधानसभा क्षेत्र सो़डल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसची फारशी ताकद नसल्याचंही ते म्हणालेत.
“२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
संजय राऊतांनी यावर म्हटलं की, मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसने अद्यापही अधिकृतपणे भूमिका मांडली नाही. त्यामुळे एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात बोलतो. असंही त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, पार्थ पवार तरूण कार्यकर्ते आहेत. ते राजकारणात काम करत आहेत. पार्थ पवार यांच्या राजकीय भविष्याचा विचार त्यांचा पक्ष करेल आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर आम्ही त्यांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. तर यावर शिवसेनेची काय भूमिका असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होतं.
Read also:
- 13 सहकारी कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले; लिलाव काढून 400 कोटी कारखाना 10 कोटीला
- मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याने माझा छळ; एकनाथ खडसेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
- आपची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर ; मात्र मराठी अभिनेता संदीप पाठकची प्रतिक्रिया व्हायरल
- सोलापुरात सचिन वाझे पॅटर्न स्टिंग ऑपरेशनमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का
- उसाला दर नाही म्हणून विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचं आंदोलन