मुंबई : शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात 80 ते 90 , तर गोव्यात 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. यापूर्वी एनआयए वृत्तसंस्थेनं शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती ट्वीटमार्फत दिली होती. परंतु, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींमध्ये शिवसेना 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे.
मन सुन्न! नराधमांना फाशीच झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरु आहे. तशी आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितलेलं आहे की, तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येतं त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.”
Shiv Sena to contest for all 403 seats in Uttar Pradesh Assembly elections in 2022. The party has not allied with any other political party as of now but has signaled the possibility of an alliance. pic.twitter.com/qqdZz6FQXH
— ANI (@ANI) September 11, 2021
एएनआय वृत्तसंस्थेनं ट्वीटकरुन माहिती दिली होती की, “शिवसेनेनंही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक 2021 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. अद्याप या निवडणूकीत शिवसेना युती करणार का? आणि कोणासोबत युती करणार? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.”
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते नेते कोण? सोमवारी फुटणार राजकीय बॉम्ब
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत शिवसेना नेत्यांनी आरोप लावलाय की, भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. राज्यात बहिणी, मुली कोणीही सुरक्षित नाही. तर जनता बेरोजगारी आणि महागाईनं त्रस्त आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेनं, उत्तर प्रदेशातील शिवसेना कार्यालयाचं प्रसिद्ध पत्रकही ट्वीट केलं आहे.
Read Also :
- लावणी सम्राज्ञी सुरेका पुणेकर राष्ट्रवादीत ठुमका लावणार; मुंबईत रंगणार पक्षप्रवेश सोहळा
- टार्ग्रेट पूर्ण करा, गळ्यात फुलांची माळ पडेल, नाहीतर…; नितिन गडकरींची प्राध्यापकांना तंबी
- मुंबईची प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहा; साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या पोलीसांना सूचना
- उद्धव ठाकरेंनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही; काँग्रेस नेत्याबद्दल चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
- चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय, हवेत गोळीबार करू नका – संजय राऊत