पुणे : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील मावळ मतदार संघातील जागा ही शिवसेने पार्थ पवार यांच्यासाठी सोडून मनाचं मोठेपण दाखवावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. अशातच आता मावळ मतदार संघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर टीका केली आहे.
33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काॅंग्रेसवर टीका करताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मी शिवसेना याठिकाणी दीड ते दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल, असं सांगितलं होतं. मावळ लोकसभा मतदारसंघात एक विधानसभा क्षेत्र सो़डल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसची फारशी ताकद नसल्याचंही ते म्हणालेत.
मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारची वागणूक मिळतेय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसैनिकांच्या मनात रोष असल्याचंही श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखविले. तसेच सत्तेचा सर्वाधिक लाभ हा राष्ट्रवादी काॅंग्रेसला मिळतो,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भाजपचे वरचे नेते अनुकुल मात्र..; पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिल्याने सतेज पाटलांची प्रतिक्रिया
मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ साली जेव्हा सन्माननीय सुप्रीयाताई राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी मा. सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवावा, असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते, असंही नितीन देशमुख यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.
Read also:
- नागपुरकरांना मुंबई प्रिय तर आम्हा लोकांना नागपुर; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा
- ” हिंदुत्वातलं जाज्वल्य सोडलं अन् सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं “
- नवाब मलिकांना अजून एक न्यायालयाचा दणका; दिलासा नाहीच
- “शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी”
- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा