अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ नुकताच आता संपणार आहे. महापौर पद रिक्त होत असल्याने पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. अहमदनगरच्या महापौर पदाची निवडणूक आता येत्या पंधरवाड्यात कधीही होऊ शकते. आमदार संग्राम जगताप कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
यावेळी महापौर पदासाठी अनुसूचित जाती-जमातीचे महिला राखीव जागेसाठी आरक्षण आहे. शिवसेना पक्षाकडे २ इच्छुक उमेदवार आहे. नरगरसेविका रोहिनी शेंडगे आणि नगरसेविका रिता भाकरे. भारतीय जनता पक्ष आणि बसपा सोडले तर प्रत्येक पक्षातच इच्छुक आहे मात्र बोटावरच मोजण्यासारखे इच्छुक असल्याने महापौर पदासाठी चुरस वाढलेली आहे. यादोन्ही उमेदवारीने पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि आता वरिष्ठांच्या निर्णयाकडे सगळेच आस लावून पाहत आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर हे सध्या नगर दौऱ्यावर आहेत.
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
मागील निवडणुकीतील पराभवाचा अनुभव लक्षात घेता पालिकेत कोणत्याही परिस्थिती शिवसेना नगरसेवकांनी आपली एकजूट ठेऊन जिंकण्याचा निर्धार केला आहे. यश ग्रँड येथे महापौरपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची आणि सर्व नगरसेवक आणि पदाधिकार्यांची बैठक झालेली आहे. पक्षस्रेष्ठी जो आदेश देतील तो आदेश नगर शहर शिवसेनेतर्फे पाळला जाणार यावर सगळ्यांचे एकमत झालेले आहे. महापौर निवडणुकीत महापौर शिवसेना पक्षाचाच होणार अशी माहिती भाऊ कोरगावकर यांनी बैठक संपल्यानंतर दिली आहे.
हे पण वाचा,
धक्कादायक: तिसऱ्या लाटेपुर्वीच अहमदनगर जिल्ह्यात तीन महिन्यात १८ हजार ६५४ बालकांना कोरोनाची लागण
अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी
अहमदनगर मध्ये पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती, समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी