पुणे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या मैदानात लेटरबॉम्ब टाकला आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे सूतोवाच केले जात असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केला असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला, त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
हे पण वाचा, प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब: भाजपशी जुळवून घेऊन परत युती करण्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला
दरम्यान, यावरून आता विविध पक्षातील नेते आपापली प्रतिक्रिया देत असून, खासकरून भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच आता, भाजप खासदार गिरीश बापट यांनी यावर भाष्य केले आहे. “हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे,” असं रोखठोक मत त्यांनी मांडलं आहे. ते आज पुण्यात आयोजि केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे पण वाचा, प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर; राजकीय भूकंप होणार? नितेश राणेंचं ट्विट
यावेळी, “भाजप-सेनेची युती, हिंदुत्व या मुद्दयावर होती. त्यामुळे, ती भविष्यातही होऊ शकते. मला असं वाटतंय, त्यांनी बोलून दाखवलेली प्रतिक्रिया, ही सर्वांच्या मनातली बोलकी प्रतिक्रिया आहे. ते सर्वांच्या मनातलं बोलले. राजकीय जीवनात सातत्याने काही बदल घडत असतात, अशा काही गोष्टी गोष्टी घडत असतात. आम्ही याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे. पण मधल्या काळात काही कृत्रिम लोकांनी ती तोडली. पण पुढे अशी युती झाली, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल,” असं त्यांनी सपष्ट केलं. तसेच, “आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे,” असंही ते म्हणाले.
Read Also :
- बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार
- आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही; राऊतांचा भाजपवर पलटवार
- शरद पवार दिल्लीला रवाना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
- स्वबळाची भाषा करणे म्हणजे, पक्षाचा आत्मघात करून घेणे; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार
- “जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका’’ निलेश राणेची शिवसेनेवर खोचक टीका