अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. शरयूचा काठ झगमगाटून गेला आहे. त्यामुळे आज जुन्या अनेक गोष्टींना उजाळा मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक हिंदूंना आज त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांची आठवण होताना दिसत आहे.
६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली. सकाळी दहाच्या सुमारास लाखांच्या संख्येत येथे कारसेवक जमले होते. त्यानंतर देशात प्रचंड सांप्रदायिक दंगेही उसळलेले बघायला मिळाले होते.त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विधानांची आजही अनेक शिवसैनिकांना आणि राम भक्तांना आठवन येते.
नेमकं काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे ‘त्या’ वेळी
स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी पाडली गेल्यानंतर जाहीर भाषणातून वक्तव्य केलं होतं. जे बरंच चर्चेतही राहिलं. साडेतीन हजार हिंदूंची देवळ पाडण्यात येऊन त्यांच्या मशिदी बांधण्यात उभ्या राहिल्या. साडेतीन हजार. आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदी द्या. बाबरी जी पडली. दोन पाडायच्या आहेत ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा तुमच्याकडे. घाला लोटांगण,” असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
आज अयोध्या येथे राम मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे आता हे राम मंदिर उभे राहिल्यानंतर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी मागितलेल्या इतर दोन मशिदींची देखील मागणी करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.