चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. कोरोनाच्या काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी आगामी काळात भाजपकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता
शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असा इशारा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांना युतीचा इतिहास माहीत नसेल. चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे पक्षात अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट कसा होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर विचारपूर्वक टीका करावी, असे क्षीरसागर म्हणाले.