कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी, आज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे पहिले मूक आंदोलन कोल्हापुरात करण्यात येत असून, यावेळी राज्यभरातील अनेक मराठा समन्वयक, सोबतच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, कोल्हापुरातील आमदार आणि अनेक खासदारांनीही या मोर्चाला उपस्थिती लावली आहे. यावेळी, तब्येत ठीक नसताना देखील हाताला सलाईन लावून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आंदोलनाला उपस्थिती लावल्याने, सर्वांचेच मनो”धैर्य” उंचावल्याचे पाहायला मिळाले.
हे पण वाचा, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांची उडी; मराठ्यांनो दलाल नेत्यांपासून सावध राहा
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी महामारीची लागण झाली होती. यातून ते बरे झाले. मात्र, त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू असून, आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी, आपल्या गाडीत सलाईन लावून थेट आंदोलन स्थळी उपस्थिती लावली. यावेळी, ‘तब्येत बरी नसली तरीही, आंदोलनात सहभागी होणे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आज शाहू महाराजांच्या भूमीत लढा दिला जात आहे. त्यामुळे, हा लढा लढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत एकत्र येण्याची गरज आहे, याची जाणीव ठेऊन मी इथं आलो आहे,’ असं मानेंनी सांगितलं.
हे पण वाचा, “दिशाभूल करणं छत्रपती घराण्याच्या रक्तात नाही”, मराठा आरक्षणावर उदयनराजेंनी मांडली रोखठोक भूमिका
तसेच, ‘हे आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना मागणी केली आहे. मात्र, असे असले तरी, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खास अधिवशेषण बोलावण्यात यावं. तसेच, राज्यतल्या ४८ खासदारांनी लोकसभा सभापतींकडे आणि राष्ट्रपतींकडे पत्र लिहून ही मागणी करावी,’ असं आवाहनही मानेंनी केलं आहे.
हे पण वाचा, शरद पवारांचा मराठा आरक्षणाशी काडी मात्र संबंध नाही
यावेळी, ‘आरक्षणाचा प्रश्न कोणामुळे अडकला आहे? कुणाचाही जर आरक्षणाला विरोध नाहीये, तर हा पेच सुटत का नाही? असा प्रश्न मराठा समाजाला पडला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन,’ असं सांगत त्यांनी, ‘संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली आणि सर्वजण या शाहुभूमीत एकत्र आले. त्यांचे हे पाऊल नक्कीच यशस्वी होईल. आता संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे,’ असं सांगत त्यांनी आंदोलकांचे मनोधैर्य उंचावले
Read Also :
- मराठा मोर्चाला सुरुवात; संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल
- कोल्हापूरात भर पावसात मुक मोर्चाला, सर्वपक्षीय नेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा
- मराठा समाजाला योग्य मार्गाने आरक्षण मिळेल, ‘तो’ मार्ग सरकारने निवडावा – प्रकाश आंबेडकर
- आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू – संजय राऊत
- संभाजीराजे यांच्या मागण्याबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक -सतेज पाटील