जळगाव : गेल्या काही दिवसात शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपल्याचे दिसत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये ‘वाघ’ प्रकरणावरून टीका-टिप्पणी सुरू आहे. आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला होता. यावर आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते तेव्हापासून भाजपची वाघाशी मैत्री होती. मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवतो, असे म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिले आहे.
तसेच, वाघ हा वाघ असतो.मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असा जोरदार टोला त्यांनी पाटलांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त केला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे या सरकारचे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांनी सूतोवाच केले आहे, ती या राज्यातल्या जनतेच्या मनातली भावना आहे. निवडणुका या एकत्र लढाव्या लागतील. आजची राज्याची व्यवस्था अशीच पुढे न्यायची असेल तर पवार साहेब जे सांगत आहेत, त्यानुसार निवडणुका एकत्र लढून पुढे जावे लागेल.
Read Also :