मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, राज्यभरातून शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर या प्रकरणी नारायण राणेंना अटक करण्यात आली आणि रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर केला गेला. मात्र, अजूनही या घटनेचे पडसाद थांबण्याचे नाव घेत नसून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, पुन्हा एकदा राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तर भाजपवरही टीका केली आहे.
“एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..” – राऊत कडाडले
“काय करायचं-काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं. फक्त एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही बोलू ना…नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू,” असं सांगत, “कोणीही काहीही विधान करत असेल, तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाहीये. आमच्याकडे कामं आहेत,” असा टोला राणेंना लगावला आहे. त्यामुळे, शिवसेना-राणे संघर्षाची धार आता आणखीनच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
“रडायचं नाही…भिडायचं आणि जिंकायचं, तहसीलदार ताई आम्ही तुमच्या सोबत”
तसेच, उ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ५ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढले होते. त्यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावर, “कोण काय बोललं मला माहिती नाही, योगी आदित्यनाथ यांच्यावर, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या विधानाला आता ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हाच का ते विधान तुम्हाला आक्षेपार्ह वाटलं नाही?” असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.
आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
“मुख्यमंत्र्यांनी तेव्हा ते विधान का केलं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून, आता भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल, पण आम्हाला नाही चांगलं वाटलं. आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. आम्हाला महाराजांबद्दलचा आदर आहे. आता भाजपत जे लोक नवे गेले आहेत, त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, त्यांनी तसं जाहीर करावं,” असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे.
Read Also :
- शिवसेना अडचणीत येणार? रश्मी – उद्धव ठाकरेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार दाखल; कारवाई होणार?
- अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, अनिल परबांच्या व्हिडीओची घेतली दखल
- मोठी बातमी : अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, काय विचारपूर केली…
- “भोकं पडलेल्या फुग्याला संजय राऊत एवढे का घाबरतात?” – गोपीचंद पडळकर
- भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई