नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणावरून मध्यंतरी ठाकरे सरकारवर, प्रामुख्याने शिवसेना मंत्र्यांवर टीका करताना, “शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे,” असा हल्लाबोल केला होता.
पिगॅसस प्रकरण: आक्रमक काँग्रेसने उचलले आंदोलनाचे पाऊल, भाजपवर केला मोठा आरोप
दरम्यान, त्यांच्या या टीकेला नेहमीप्रमाणे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले असून, राऊतांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली, यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “दानवे माझ्या घरापासून दोन पाऊलांवरच राहतात. त्यामुळे मराठा आरक्षणावर आम्ही दानवेंचा कोचिंग क्लास लावून टाकू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू, पण आरक्षण द्या,” अशी खोचक टीका केली आहे.
ऑक्सिजन अभावी मृत्यू राज्यातही नाही? भाजपने ठाकरे सरकारला पाडले उघडे
“आज सकाळी अशोक चव्हाण माझ्याकडे आले. ते मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी चर्चेत काही कायदेशीर बाबी मांडल्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यामुळे आम्हाला शिकवणी, अभ्यास वगैरे शिकवू नका; हिंमत असेल तर बोलू नका. आधी मराठ्यांना आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा, नाही तर आम्हाला पण शिकवता येतं,” असा जोरदार पलटवार त्यांनी केला आहे.
या कारणामुळे जितेंद्र आव्हाडांवर गरजले अजित पवार, भर बैठकीत म्हणाले…
यावेळी, “आजच्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचं निवेदन दिलं होतं. त्यात राज्याच्या विकासा संदर्भांत अनेक प्रश्न आहेत. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्यांचा मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करावा यासाठी ही बैठक होती. आता या मागण्यांवर आम्ही पंतप्रधानांना भेटायचं ठरवलं आहे. त्यांची वेळ मिळताच या मागण्या पुन्हा एकदा मागण्या त्यांच्यासमोर सादर करणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
Read Also :
- उपमुख्यमंत्र्यांनंतर ‘अनलॉक’ बाबत राजेश टोपेंचेही सूचक विधान!
- फडणवीसांना माझे नेते मानण्याचा विषयच नाही कारण…पंकजा मुंडेंचे पुन्हा स्पष्टीकरण
- जे केंद्राने सांगितले तेच ठाकरे सरकारनेही केले आहे, “संजय राऊतजी, तुम्हालाच नाही, तर आम्हालाही धक्का बसलाय!”
- जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा! भाजपची आक्रमक मागणी
- ठाकरे सरकार उचलू शकते मोठे पाऊल! दोन डोस घेतलेल्यांना मिळणार ही सवलत