शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा आज आणखी एक टिझर रिलीज केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सरकार पाडण्याचे खुले आव्हान देत आहेत.
महाराष्ट्रात तीन चाकी सरकार, मग केंद्रात किती चाकी आहे? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही. माझी मुलाखत सुरु असतानाच सरकार पाडा, असे खुले आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले आहे.
"महाराष्ट्रात तीन चाकी सरकार.
मग केंद्रात किती चाकी आहे?"
ऊध्दव ठाकरे यांची Unlocked मुलाखत.
सामना pic.twitter.com/uuBM1BewyN— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2020
नवीन प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारण, महाविकास आघाडी, चीनसोबतचा वाद आणि शिवसेना या मुद्यांवर भाष्य करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीला तीन चाकी सरकार असल्याची टीका वारंवार केली जाती. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मग केंद्रात किती चाकी सरकार आहे ?
राष्ट्रीय राजकारणावर बोलताना ते म्हणाले की,, “आत्ता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?,” मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना ते म्हणाले की, “साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असे नाही आहे. हा योगायोग आहे. शिवसेनाला आत्मनिर्भर बनविण्याच्या स्वप्नाविषयी देखील या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, ही मुलाखत दोन भागांमध्ये दैनिक सामनामध्ये 25, 26 जुलैला प्रसिद्ध होणार आहे.