मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना, एका कार्यक्रमात मंचावर उपस्थित भाजपच्या नेत्यांकडे पाहून त्यांचा, ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीमाध्यमांशी बोलताना आज पुन्हा भाष्य केले असून, ‘कुणी तरी आहे तिथे, त्यांना यायचे आहे आमच्याकडे, असाच मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे,’ असे सांगत पुन्हा एकदा चर्चांचा धुरळा उडवून दिला आहे.
पुण्यात अनेक भाजप नगरसेवक माझ्या संपर्कात!
त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजपतील कोणता नेता महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहे, याला घेऊन तर्कवितर्क लढवले जात आहेत. राऊत म्हणाले, ‘ठाकरेंची स्वत:ची शैली आहे. त्यातच ते बोलले. त्यांनी सरकार पडेल किंवा आम्ही सरकारमधून बाहेर पडू असे म्हटले नाही. ते स्पष्ट म्हणाले, ज्यांना भावी सहकारी व्हायचे आहे, जे आमच्याकडे येऊ इच्छितात. त्यांना उद्देशून त्यांनी विधान केले.’
युती झाल्यास पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच का? दानवे म्हणतात…
‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ‘मला माजी मंत्री म्हणू नका’ असं म्हणतात. या त्याबाबतच्या हालचाली आहेत. कदाचित त्यांना इथे यायचे आहे. त्यासाठीच ठाकरेंनी तसे संकेत दिले. तुम्ही या, आणखीन काही लोक येऊ इच्छित आहेत. पाटील म्हणाले २-३ दिवस थांबा, तर काही लोक लगेच पतंग उडवायला लागले. पतंग वर जाते आणि कापली जाते,’ असा टोला लगावत राऊत यांनी, ‘हे सरकार ५ वर्ष चालवण्याची शिवसेनेने कमिटमेंट दिली आहे. आम्ही खंजीर खुपसत नाही. आम्ही शब्द पाळणार.’ असे सांगितले.
‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार म्हणतात, ‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं…’
तसेच, ‘कुणाला पतंग उडवायचाच असेल तर त्यांनी ते उडवावेत, ते कधी कापायचे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे, सरकारला कोणताही धोका नाही. ज्या लोकांनी शिवसेना भवनात जाऊन तोडफोडीची भाषा केली. ज्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची धमकी दिली. जे लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, अशा विचारधारेच्या पक्षासोबत युती कशी होणार, असा सवाल राऊत यांनी केला.
Read Also :
- ब्रेकिंग! वाझेचा खुलासा, पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी मागितले २ कोटी
- गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात काय चालू, काय बंद?
- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
- संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’