मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांचे दीर्घ काळचे सहकारी, ‘सामना’चे (संपादक) आणि खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांना, ट्विटरवर व्हिडिओ ट्विट करून मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियाचा कमी वापर अन् निवडणुकीच्या तयारीला लागा; राज ठाकरेंनी टोचले कान
तसेच, त्यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना देखील पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देताना, “मी त्यांना गेली ४५ वर्षे ओळखतो. देशाला उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज आहे आणि भविष्यात ती लागली, तर नेतृत्व करण्यासाठी ते सक्षम आहेत आणि नक्कीच त्यांचं नेतृत्व प्रदीर्घ काळ टीकेल,” असा विश्वास दाखवला आहे.
“या परिस्थितीत महाराष्ट्रात आलात तर…”, संजय राऊतांनी केंद्रातल्या मराठी मंत्र्यांना दिले आव्हान!
तसेच, “राज्यातल्या सध्याच्या परिस्थतीचे गांभीर्य लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना विनम्रपूर्वक आवाहन केलं आहे; की वाढदिवस साजरा करू नका. कारण जनतेचं दुःख ते जाणतात. अनेकांना उद्धव ठाकरे हे आपले भाऊ, मुलगा वाटत आहेत. मुख्यमंत्री प्रत्येकाला आपले कुटुंबप्रमुख वाटणे हेच त्यांचं यश आहे. त्यांचं नेतृत्व असंच बहरत राहो,” अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
अखंड साथ.अतूट नाते.
राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..तो दिवस लवकरच उगवेल..
आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!@OfficeofUT pic.twitter.com/brQEcwDo3T— Sanjay Raut (@rautsanjay61) July 27, 2021
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सलग ३ दिवस, राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला, तसेच अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी, तातडीने लागेल ती सर्वप्रकारची मदत आणि सहकार्य शासनाकडून केले जाईल, असे आश्वासन पूरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्तांना दिले आहे. त्यामुळे, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर करावी आणि आस्मानी संकटाने पुन्हा एकदा होरपळून निघालेल्या या लोकांना दिलासा द्याव, अशीच अपेक्षा आहे.
दोन दिवसात पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार; शरद पवारांची घोषणा
गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रायगडमध्ये हाहा:कार उडाला आहे. यामुळे आत्तापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. ९०,००० जणांचे स्थलांतर केले गेले असून, निसर्गाच्या या प्रकोपात तब्बल २५ हजार ५६४ जनावरं दगावली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने ही अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली आहे.
Read Also :
- ‘जनता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय’, नारायण राणे यांची टीका
- लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजीवरून काँग्रेस-भाजप आमनेसामने, नाना पटोलेंचा थेट आयुक्तांना फोन
- …..म्हणून चढला मंत्र्यांसमोरच भास्कर जाधवांचा पारा
- नागपूर महापालिका: ‘तुम्हीच उमेदवार ठरवा, आता गटबाजी खपवून घेणार नाही’ – नाना पटोले
- आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे