नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना, एका कार्यक्रमात मंचावर उपस्थित भाजपच्या नेत्यांकडे पाहून त्यांचा, ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून, ‘उद्धव ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला कंटाळले असावेत, त्यामुळेच कदाचित पुन्हा त्यांना भाजपसोबत यायची इच्छा झाली असावी,’ अशी प्रतिक्रिया रिपाइंचे (आठवले गट) रामदास आठवले यांनी दिली आहे.
राऊत म्हणतात… मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ तसाच आहे
‘शिवसेना-भाजपने एकत्र यावे, असे मी आधीपासूनच म्हणत आलो आहे. राज्यात युतीचे सरकार आले तर ते राज्याच्याच हिताचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सेनेला काहीच फायदा नाही. त्यांनी युती करावी आणि पुन्हा सत्तेत यावे. काल ठाकरे यांनी हळूच का होईना, पण तसे संकेत दिले आहेत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, अशाच प्रतिक्रिया सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या. त्यामुळे, हे दोन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल,’ असं ते म्हणाले.
पुण्यात अनेक भाजप नगरसेवक माझ्या संपर्कात!
‘आत्ताचे महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या प्रत्येक अपयशासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यात शिवसेना-भाजपचे युतीचे सरकार आल्यास कमीत कमी हा प्रकार तरी कायमचा बंद होईल आणि केंद्र व राज्यात एकाच पक्षांचे सरकार असल्याचा फायदा देखील अखेरीस महाराष्ट्रालाच होणार आहे. त्यामुळे राज्याचेच भले होणार आहे. या गोष्टीचा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी विचार करावा. सोबत बसून यावर चर्चा करावी आणि मिळून मार्ग काढावा,’ असे त्यांनी नमूद केले.
युती झाल्यास पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच का? दानवे म्हणतात…
तसेच, ‘आत्ताही सेनेत असे बरेच आमदार आहेत, ज्यांना अजूनही भाजपसोबत जावे असे वाटते. त्यामुळे, आता उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. भाजप त्यांचे स्वागतच करेल. अजूनही वेळ पूर्ण गेलेली नाही. भाजपच्या नेत्यांनी देखील पुढाकार घ्यावा. यासाठी मी फडणवीस यांची भेट घेणार असून, त्यांना सुद्धा ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला अद्यापही असे वाटते, शिवसेना या महाविकास आघाडीतून बाहेर पडेल आणि राज्यात लवकरच नवीन सरकार बनेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Read Also :
- ब्रेकिंग! वाझेचा खुलासा, पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी मागितले २ कोटी
- गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात काय चालू, काय बंद?
- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
- संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’