सुशांतसिंह आत्महत्येचे प्रकरण हाताळण्यावरुन अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. त्यावर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. “मॅडम तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरवसा नसेल तर!” असं म्हणत युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिलंय.
मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता??
सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !! https://t.co/ITw8AKLN0P
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 3, 2020
“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live – for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020