येत्या पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत प्रस्तावित राममंदिराचे भूमीपुजन केले जाणार आहे. मात्र या भूमिपूजनाची सध्या राजकीय वातावरणात जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र आता राममंदीराच्या भूमीपुजन कार्यक्रमावेळी अजून संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अयोध्येत येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या राममंदीराच्या भूमीपुजन कार्यक्रमाच्यावेळी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनीही हल्ला होण्याची शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे.
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या घटनेची याच दिवशी वर्षपूर्ती होत आहे. त्यामुळे हा हल्ला होऊ शकतो, असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. त्यामुळे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. अयोध्येत होणाऱ्या भूमीपुजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, राममंदीर आंदोलनाशी संबंधित नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.