शिर्डी: राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आलेली आहे. अध्यक्षपदासाठी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चुरस लागलेली आहे.
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करण्यासाठी ‘या’ ग्रामपंचायतीने मांडला ठराव
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
साई संस्थानमध्ये संभाव्य नवे मंडळ व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद असला पाहिजे. साई संस्थानची नियोजित विकासकामे वेगाने पूर्ण करण्यात यावी. शिर्डी येथे आत्मीयतेने आणि श्रद्धेने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनव्यवस्था व अन्य सुविधा तसेच बाजारपेठेला पूरक वातावरण राहावे यासाठी नव्या मंडळात स्थानिकांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षस्रेष्टींकडे केली आहे. साई संस्थानाच्या प्रत्येक निर्णयाचा व बदलाचा स्थानिक बाजार पेठेवर परिणाम होत असतो. चार पैकी एखादे महाद्वार काही कारणामुळे बंद करावे लागल्यास त्या भागातील व्यापार थंडावतो हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा मेळ साधण्याचे काम स्थानिक विश्व्स्त करू शकतात शकतात.
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मतदारसंघातील थेट वावर प्राध्यापक राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमीच संस्थानासाठी आपले योगदान दिलेले आहे. त्यामुळे आता शिवसेना नेते कमलाकर कोते, राहुल गोंदकर, एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले व अन्य मंडळी साई संस्थान अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. ज्या ज्या वेळी स्थानिकांना डावलून केवळ राजकीय सोय म्हणून विश्व्स्तपदी वर्णी लावण्याचे निर्णय झालेले आहेत त्यावेळी ग्रामस्थ आणि मंडळात संघर्षाचे अनेक प्रसंग उभे राहिलेले आहेत. हे टाळण्यासाठी आता स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हे पण वाचा,
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन