लातूर : अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे कागदावरचे नेते आहेत. ऑफिसच्या एसीत बसून मोठे झालेले हे लीडर आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना डिवचले आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर
देवेंद्र फडणवीस आज लातूरमध्ये आहेत. लातूरमधील पूरपरिस्थितीची ते पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचा दुःख काय माहीत? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं, असं फडणवीस म्हणाले.
शिवसेना खासदार भावना गवळींना वर्षावर नो एन्ट्री; अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही
राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही एकाही मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सीएम सोडाच पालकमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला नाही. सीएम यांनी तात्काळ दौरा केला पाहिजे. हे सरकार विदर्भ, मराठवाडा विरोधी सरकार आहे, असा आरोप करतानाच पीकविमा सरकारची जबाबदारी आहे. कंपनीवर दबाव वाढवत शेतकऱ्यांना सरकारनेच दिलासा दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
राज्यात अतिवृष्टी आहेत. सरकार मदत करत नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशावेळी तुम्ही सत्तेत नाही, याची खंत वाटते का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आम्हाला खंत वाटते, पण आम्ही मात्र आम्ही विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, असं त्यांनी सांगितलं. दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मांजरा धरणारे दरवाजे योग्य पद्धतीनं उघडले गेले होते का? असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली होती. राज्य सरकारनं आही मदत द्यावी त्यानंतर केंद्राकडून पैसे घ्यावेत, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- अभ्यास नको, गप्पा मारा; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची वर्गात जाऊन भन्नाट सुरूवात
- देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश
- राज्यातील विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – चंद्रकांत पाटील
- रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद – फडणवीस
- विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट